उस्थळ दुमाला येथे शेतकरी मॉलचे संत महंतांच्या हस्ते उदघाटन ; अन्नधान्य पिकविण्यात शेतकरी अग्रेसर असल्यामुळे कोरोनाच्या संकटकाळात देश तरला-हभप उद्धव महाराज.
नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला येथे कृषी तज्ञ कालीदास शेळके यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या शेतकरी मॉलचे संत महंतांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.नवनवीन तंत्रज्ञान पुढे येत असतांना आधुनिक शेतीकडे शेतकरी वळतांना दिसत आहे.अन्नधान्य पिकविण्यात देशातील शेतकरी अग्रेसर असल्यामुळेच कोरोनाच्या संकटकाळात अन्नदानाचा तुटवडा जाणवला नाही देशही तरला,शेतकऱ्यांना राजासारखी वागणूक मिळण्यासाठी दृष्टीकोन बदलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी येथील वयोवृद्ध शेतकरी आसाराम काळे हे होते. श्रीराम साधना आश्रमाचे प्रमुख महंत सुनीलगिरी महाराज,महंत गोपालानंदगिरी महाराज,ह.भ.प. विष्णू महाराज सांगळे,ह.भ.प मंगेश महाराज वाघ,पंचायत समितीचे उप सभापती किशोर जोजार,आदर्शगाव सुरेशनगरचे सरपंच पांडुरंग अभंग, हंडीनिमगावचे सरपंच आण्णासाहेब जावळे, उस्थळ दुमालाचे सरपंच बाबासाहेब कोतकर,मुकींदपुरचे सरपंच
![]() |
नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________
Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇
दादासाहेब निपुंगे,सोसायटीचे अध्यक्ष सुभाष गायकवाड शेतकरी नेते पी.आर.जाधव,होमगार्ड समादेशक पत्रकार बाळासाहेब देवखिळे,रमेश सावंत यावेळी उपस्थित होते.प्रारंभी नंदकुमार शेळके,कालीदास शेळके,राजेंद्र शेळके,बाळासाहेब शेळके यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे स्वागत केले.शेतकरी नेते पी.आर.जाधव यांनी प्रास्ताविक केले.नगर औरंगाबाद हायवेवर भविष्य काळात मोठा मॉल शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केला जाईल कांदा बियाणे निर्मिती येथेच होणार असल्याने दर्जेदार बियाणे देखील रास्त दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल असा मानस यावेळी बोलताना व्यक्त केला.




