"उद्यान पंडित" हा राज्यपालांकडून बहुमान मिळाविलेले राहुल रसाळ ठरले शेतकरी व उच्चशिक्षित तरुणांसाठी आदर्श !
कृषी क्षेत्रात नवनवीन कृषी तंत्रज्ञानाचा वापर करत रसाळ यांनी निघोज मध्ये घडविली कृषी क्रांती !
पारनेर- प्रतिनिधी
निघोज येथील प्रगतशिल शेतकरी राहूल अमृता रसाळ यांनी आपापल्या शेतात आधुनिक व विविध प्रयोग करून कृषी क्रांती घडविल्याने त्यांचे शेतातील प्रयोग पाहण्यासाठी राज्यातून शेतकरी निघोज येथे मोठ्या प्रमाणावर येतात .
राहूल रसाळ यांचे १० वी ची शिक्षण घेत असताना त्यांनी कुटुंबाला शेतातील कामांना हातभार लावण्यास सुरुवात केली . शेती करून बी एस सी ॲग्री पर्यंत शिक्षण घेतले . त्यावेळी त्यांच्या अडीच एकर शेतीत थॉमसन सीडलेस हिरव्या द्राक्षाची लागवड केली , पण या द्राक्षांना बाजारात मागणी कमी होत चालली होती , त्यांना समजले की , परदेशात लाल रंगाच्या द्राक्षांना मोठी मागणी आहे , त्यामुळे त्यांनी २००६ साली क्रिमसन या लाल रंगाच्या द्राक्षांची लागवड केली , २०१२ सालापर्यंत त्यांच्या या द्राक्षांना परदेशात खूप चांगला बाजार मिळाला . त्यांनी त्यांच्या शेतात केलेल्या आधुनिक प्रयोगामुळे प्रती एकर १० टन द्राक्ष उत्त्पन्न निघत असे , ही द्राक्षे प्रती किलो १२० ते १४० रुपये दरानी विकली गेल्याने त्यांना प्रती एकर १२ ते १४ लाख रुपये उत्पन्न मिळाले , तर कधी कधी मागणी वाढल्यावर १६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले . सध्या १४ एकर शेतात द्राक्षांची बाग आहे , त्यामुळे कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न शेतीतून मिळते . शिवाय द्राक्षवेलीच्या रांगेत कारले , पडवळ वा इतर भाजीपाल्याचे पिके आंतरभूत पद्धतीने घेतात , त्यामुळे घरचा वा पाहुणे रावळ्यांना वानवळा देण्याचे काम होवून जाते किंवा घर खर्च यावर भागविला जातो . तर आज त्यांच्या २५ एकर शेतात अतिशय सुंदर पद्धतीची डाळींब बाग डौलाने उभी आहे . डाळींबाला २०० रूपये किलो भाव मिळतो . तर ४ एकर शेतात पेरू बाग उभी आहे . पेरूला ही १०० रुपये किलो ने भाव मिळाला आहे .
